राहुरी बंदचा निर्णय मागे; महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात राहुरीकरांची संयमाची भूमिका

राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालमीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकाराचा समाजाच्या सर्व स्थरातून निषेध करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरु असला तरी, घटनेला तीन-चार दिवस उलटूनही या प्रकरणात अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नव्हती. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १ एप्रिलपासून राहुरी बंदची हाक दिली होती. परंतु ३१ मार्चला…

Read More

मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर विजय, प्रदार्पणातच चमकलेला आश्विनी कुमार नेमका कोण

मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात चार विकेट घेतल्या. प्रदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. “आधी थोडा दबाव होता. त्या दबावाने मी दुपारी जेवलोही नाही, असं त्याने डावाच्या मध्यावर मुलाखत देताना सांगितलं. काय म्हणाला आश्विनी कुमार मेगा लिलावात ३० लाख रुपयांना खरेदी झालेल्या अश्वनीने सांगितले…

Read More

पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार?

सोने आणि महिलावर्ग हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. सोन्याची गोष्ट सुरु तर महिलांना रहावत नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून वाढलेले सोन्याचे दर, पाहता सोने महिलांच्या हाताबाहेर चाललेले दिसू लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली….

Read More

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; काय काय म्हणाले, वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये…

नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…

Read More

नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…

सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…

Read More

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. कुठे झाले लोकार्पण? नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले….

Read More

शिर्डीत होणार आणखी एक विमातळ; नगरकरांना नेमका काय फायदा होणार? वाचा

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला….

Read More

महाराष्ट्र हादरला ! प्रेयसीशी झालं भांडण, १८ वर्षांच्या कोवळ्या पोराने उचललं टोकाचं पाऊल

अगदी कोवळ्या वयात प्रेमात पडणं व त्यानंतर नको ते पाऊल उचलण्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगरमध्ये आज ऐन पाडव्याच्या दिवशी अशीच एक घटना उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर कडाक्याचे भांडण झालेल्या १८ वर्षीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र एवढे…

Read More

रोहित पवारांनी करुन दाखवलं! कर्जतमध्ये रंगल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा; वेताळ शेळकेने जिंकली चांदीची गदा

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. शरद पवारांच्या हस्ते वेताळ शेळके याला चांदीची गदा भेट देण्यात…

Read More