नगर जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा, ‘या’ गावांत शेतीचे झाले अतोनात नुकसान

हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गेली तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी…

Read More

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू; मृतात पती-पत्नीसह डॉक्टरचा समावेश

श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यात पती-पत्नीसह एका डॉक्टरचा समावेश आहे. नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर अपघात वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पती-पत्नी ठार काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कुटे हॉस्पीटल समोर दुधाचा टँकर (क्र. एमएच 17 बीझेड 1221) वरील चालकाने अ‍ॅक्टीव्हाला (क्र. एमएच 17 सीजे 8524)…

Read More

आनंदाची बातमी! शाळा व्यवस्थापन समितीवर गणवेश वितरणाची जबाबदारी, नेमका बदल काय? वाचा

जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्यावेळचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाकडून कापड खरेदी करून सर्व शाळांना त्याचे वितरण करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025-26 पासून मोफत गणवेश योजनेची…

Read More

अंतराळातून भारत अद्भुत आहे, ‘माझ्या वडिलांच्या मायदेशी परत जाण्याची खात्री आहे’………सुनीता विल्यम्स . म्हणतात ( NASA Astronaut )

सुनीता विल्यम्स म्हणाल्या….”मला आशा आहे, आणि मला खात्री आहे की, मी माझ्या वडिलांच्या मायदेशी परत जाईन आणि लोकांशी भेट देईन आणि अ‍ॅक्सिओम मिशनवर जाणाऱ्या पहिल्या, किंवा पहिल्या नसलेल्या, भारतीय नागरिकाबद्दल उत्साहित होईन, खूपच छान,” “भारत अद्भुत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून गेलो तेव्हा तेव्हा आणि मी तुम्हाला सांगेन की, बुचने हिमालयाचे काही अविश्वसनीय फोटो काढले….

Read More

राहुरी बंदचा निर्णय मागे; महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात राहुरीकरांची संयमाची भूमिका

राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालमीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकाराचा समाजाच्या सर्व स्थरातून निषेध करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरु असला तरी, घटनेला तीन-चार दिवस उलटूनही या प्रकरणात अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नव्हती. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १ एप्रिलपासून राहुरी बंदची हाक दिली होती. परंतु ३१ मार्चला…

Read More

मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर विजय, प्रदार्पणातच चमकलेला आश्विनी कुमार नेमका कोण

मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात चार विकेट घेतल्या. प्रदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. “आधी थोडा दबाव होता. त्या दबावाने मी दुपारी जेवलोही नाही, असं त्याने डावाच्या मध्यावर मुलाखत देताना सांगितलं. काय म्हणाला आश्विनी कुमार मेगा लिलावात ३० लाख रुपयांना खरेदी झालेल्या अश्वनीने सांगितले…

Read More

पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार?

सोने आणि महिलावर्ग हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. सोन्याची गोष्ट सुरु तर महिलांना रहावत नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून वाढलेले सोन्याचे दर, पाहता सोने महिलांच्या हाताबाहेर चाललेले दिसू लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली….

Read More

शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली

जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…

Read More

राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; काय काय म्हणाले, वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये…

नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…

Read More

नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…

सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…

Read More